Posts

राधानगरी धरण 61 टक्के भरले.

Image
  राधानगरी धरण 61 टक्के भरले. -----------------------------------  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे -----------------------------------  राधानगरी धरण सततदार पावसामुळे 61% भरले असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढत असल्याने धरण परिसरात आज सकाळी सहा वाजेपर्यंत 116 मिलिमीटर पाऊस झाला असून धरणाची पाणी पातळी 326.60 मिलिमीटर इतके आहे तर पाणीसाठा 5.11 tmc इतका आहे तर एक जून ते 21 जून अखेर 796 मिलिमीटर पाऊस झाला असून धरण 61.20% भरले असून धरण भरण्यास 20 फूट कमी असल्या ची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली तसेच बीओटी मधून 1600 क्यू शेक तर सेवा द्वारे 1500 क्यू सेक असा एकूण 3100 क्यूशे क पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सोडण्यात आले असल्याने भोगावती नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान भोगावती  पाटबंधारे खात्याकडून करण्यात आले

योगामुळे केवळ शरीरच नव्हे, मनही निरोगी राहते” – योगाचार्य सुनील काणेकर.

Image
 “ योगामुळे केवळ शरीरच नव्हे, मनही निरोगी राहते” – योगाचार्य सुनील काणेकर. ------------------------- चंदगड प्रतिनिधी आशिष पाटील ------------------------- दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात प्राचार्य आर. पी. पाटील यांनी २१ जून या दिवसाचे भौगोलिक आणि अध्यात्मिक महत्त्व सांगत, विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागृती निर्माण केली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे योगगुरु सुनील काणेकर यांचे शास्त्रशुद्ध योगप्रात्यक्षिक. विद्यार्थ्यांना विविध योगासने शिकवत असतानाच त्यांनी योगशास्त्राचे मूलभूत तत्वज्ञान सुलभ आणि रंजक उदाहरणांच्या माध्यमातून समजावले. "योगामुळे केवळ शरीरच नव्हे, तर मनही निरोगी राहते. व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि जीवनशैली सुधारण्यासाठी योग हे एक प्रभावी साधन आहे," असे भावपूर्ण उद्गार श्री. काणेकर यांनी यावेळी काढले. त्यांनी आयुर्वेदाच्या अनमोल ज्ञानाचाही परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. या कार्यक्रमात ग्रंथपाल शरद हदगल यांनी तयार केलेल्या "योगमंत्र"...

सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून तो कितपत योग्य?

Image
 सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून तो कितपत योग्य? ------------------------------------------------------------- सातारा जिल्हा प्रतिनिधी - अमर इंदलकर ----------------------------------------------------------- सातारा जिलह्यात अनेक पर्यटण स्थळे असून पावसाळ्यात ह्या पर्यटन स्थळाना खूप मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील होते. पुणे, मुंबई, बारामती,अशा विविध ठिकाणाहुन हौसी पर्यंटक शनिवारी रविवार सुट्टीच्या दिवशी गर्दी करतात. सातारा जिल्ह्यात ठोसेघर धबधबा, कास पठार, पाचगणी,  महाबळेश्वर,इत्यादी अनेक ठिकाणे असून तेथील गरीब लोकांचा उदरनिर्वाह हा ह्या पर्यटक लोकांवरच अवलंबून असतो. सातारा जिल्हा प्रशासनाने घेतलेला 19 ऑगस्ट पर्यंत साताऱ्यातील सर्व पर्यटन बंद हा निर्णय थोडा कठोरपणाचा वाटत असून अशा निर्णयावर जनतेतून समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरड कोसळेल म्हणून पर्यटण बंद करण्याची वेळ येण्यापर्यंत प्रशासन एप्रिल- मे महिन्यात झोपा काढत होते का? अशी प्रतिक्रिया उमटताना पाहावंयास मिळत आहे.

दिव्यांगांच्या सर्वागीण व्यक्तिमत्व विकासाचे रोजगारभिमुख प्रवेश व्दार खुलं : मॅक अध्यक्ष मोहन कुशीरे मोफत प्रशिक्षणातून दिव्यांग्यांना रोजगार देणार

Image
 दिव्यांगांच्या सर्वागीण व्यक्तिमत्व विकासाचे रोजगारभिमुख प्रवेश व्दार खुलं : मॅक अध्यक्ष मोहन कुशीरे मोफत प्रशिक्षणातून दिव्यांग्यांना रोजगार देणार . ------------------------------------------------------------ शशिकांत कुंभार --------------------------------------------------------- दिव्यांगांच्या सर्वागीण व्यक्तिमत्व विकासाचे रोजगारभिमुख प्रवेश व्दार खुलं झालं असून व्यक्तिमत्वाला साजेसे सहज पेलता  येईल असे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मॅक असोसिएशन सर्वोतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन मॅक अध्यक्ष मोहन कुशीरे यांनी केले. असोसिएशन पर्सन विथ डिसअबिलिटी बेंगलोर, महिला कल्याण संस्था, बेळगाव, युवा ग्रामीण विकास संस्था, गारगोटी, हेल्पर्स ऑफ हंडीकॅप्ड , कोल्हापूर यांच्या संयुक्त सहयोगाने  दिव्यांग युवक - युवती साठी मोफत ३० दिवसाच्या रोजगार विषयक कौशल्ये प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हेल्पर्स संस्थेचे अध्यक्ष अभिजित गारे होते.  यावेळी महिल कल्याण संस्थेच्या वैजयंती चौगुला म्हणाल्या की, सामाजिक क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान प्रेरण...

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल.

Image
 श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल. -------------------------------------------------- अमर इंदलकर सातारा . -------------------------------------------------- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. २६/०६/२०२५ ते दि.३०/०६/२०२५ अखेर सातारा जिल्हयातून मार्गक्रमण करणार असून सदर पालखी सोहळा पुणे जिल्हयातुन सातारा जिल्हयात दि. २६/०६/२०२५ रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद, तरडगांव, फलटण, वरड या ठिकाणी मुक्काम करुन दि.३०/०६/२०२५ रोजी सोलापूर जिल्हयात जाणार आहे. सदरचा पालखी सोहळा हा निरा लोणंद फलटण मार्गे पंढरपुर रस्त्याने जाणार असलेने तसेच पालखी सोहळयात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने पालखी जाणारे मार्गावर कोणताही अपघात घडु नये, वाहतुक समस्या निर्माण होवू नये तसेच अनुचीत प्रकार घडू नये याकरीता  पोलीस अधीक्षक सातारा महाराष्ट्र यांनी  पालखी सोहळयातील वाहनांखेरीज व अत्यावश्यक सेवेतील (पोलीस रुग्णवाहीका, अग्निशामक वाहने) खेरीज करून इतर सर्व वाहनांना निरा लोणंद पंढरपूर मार्गावर दि. २५/०६/२०२५ ते दि.३०/०६/२०२५ या कालावधीत खाल...

फी भरूनही माहिती अधिकारात माहिती देण्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची टाळाटाळ.

Image
 फी भरूनही माहिती अधिकारात माहिती देण्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची टाळाटाळ. ------------------------------------------------- मंगेश तिखट चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी  ------------------------------------------------- कोरपना: माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) अर्ज करून आणि आवश्यक शुल्क भरूनही औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. यामुळे माहिती मिळवू इच्छिणाऱ्या अर्जदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरपना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने (ITI) माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) अर्जदाराला माहिती देण्यास टाळाटाळ केल्याची बातमी समोर आली आहे. अर्जदाराने फी भरूनही त्याला आवश्यक माहिती मिळाली नाही, असे म्हटले आहे. काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केला होता. नियमानुसार, अर्जदाराने यासाठी आवश्यक असलेले शुल्क (फी) देखील भरले. मात्र, शुल्क भरूनही संस्थेने त...

कोल्हापूर हद्दवाढविरोधात ग्रामीण भागाचा कडकडीत बंद; निवडणुकीवर परिणामाची शक्यता.

Image
 कोल्हापूर हद्दवाढविरोधात ग्रामीण भागाचा कडकडीत बंद; निवडणुकीवर परिणामाची शक्यता. ------------------------------------------------ शशिकांत कुंभार ------------------------------------------------   कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध दर्शवण्यासाठी जिल्ह्यातील २० ग्रामीण गावांनी आज मोठ्या प्रमाणात 'बंद'ची हाक दिली होती. या बंदला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे, ज्यामुळे आगामी काळात हद्दवाढीचा मुद्दा अधिक ज्वलंत होण्याची चिन्हे आहेत. आजच्या बंदमध्ये गोकुळ शिरगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. कणेरी मठ परिसर आणि उजळवाडी परिसरातही व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून हद्दवाढीस विरोध दर्शवला. काही ठिकाणी बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला, तर काही गावांमध्ये संमिश्र प्रतिसाद दिसून आला. गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ हा एक संवेदनशील मुद्दा बनला आहे. शहरी भागातील नागरिक शहराच्या विकासासाठी आणि वाढत्या गरजांसाठी हद्दवाढ आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत आहेत, तर ग्रामीण भागातील जनतेचा या हद्दवाढीला तीव्र विरोध आहे. हद्दवाढ झाल्यास ग...