Posts

राजापूरमधील पाचल येथे अप्पर तहसील कार्यालय करण्यात यावे:"सदाभाऊ खोत यांची पावसाळी अधिवेशनात मागणी".

Image
  राजापूरमधील पाचल येथे अप्पर तहसील कार्यालय करण्यात यावे:"सदाभाऊ खोत यांची पावसाळी अधिवेशनात मागणी". ---------------------------------  राजापूर प्रतिनिधी तुषार पाचलकर  ----------------------------------  राजापूर तालुक्याच्या प्रशासनिक सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची मागणी विधानभवनात पुढे आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात ‘अप्पर तहसील कार्यालय’ सुरू करण्याची मागणी केली. राजापूर तालुका मोठ्या भूभागावर विस्तारलेला असून, अनेक दुर्गम गावांमुळे नागरिकांना तहसील कार्यालयाच्या सेवांसाठी लांबचा प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर अप्पर तहसील कार्यालय उभारल्यास प्रशासन अधिक कार्यक्षम होईल आणि सामान्य जनतेला सोयीच्या सेवा मिळतील, असा मुद्दा श्री. खोत यांनी अधिवेशनात मांडला. ते म्हणाले, “राजापूरमधील जनतेला शासकीय सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी अप्पर तहसील कार्यालयाची नितांत आवश्यकता आहे. ही मागणी लवकरच मान्य होऊन निर्णय घेतला जावा अशी अपेक्षा आहे.” या माग...

विद्यार्थ्यांनी अनुभवला लोकशाहीचा उत्सव दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डिजिटल निकालाचा थरार.

Image
  विद्यार्थ्यांनी अनुभवला लोकशाहीचा उत्सव दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डिजिटल निकालाचा थरार. -------------------------------- चंदगड प्रतिनिधी  आशिष पाटील  -------------------------------- चंदगड : दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे शालेय मंत्रीमंडळ निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. खेडूत शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ही निवडणूक गुप्त मतदान प्रणालीद्वारे घेण्यात आली. विशेष म्हणजे मतमोजणी डिजिटल पद्धतीने स्क्रीनवर करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकाल पाहण्याची उत्सुकता आणि थरार द्विगुणित झाला. डिजिटल बोर्डवर जाहीर झालेल्या निकालामुळे प्रत्येक मतानंतर निकालात होत असलेले बदल विद्यार्थ्यांसाठी नवीन अनुभव ठरले. निकाल समोर येताच शाळेचे प्राचार्य आर. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रीमंडळाची प्रथम कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी काही ठोस निर्णय घेत धडाकेबाज सुरुवात केली. नवीन कॅबिनेट मंत्रीमंडळ याप्रमाणे:  मुख्यमंत्री: ओमकार हरिष जाधव उपमुख्यमंत्री: प्रणय भैरू कांबळे विद्यार्थिनी प्रतिनिधी: कु. सृष्टी शाहू गाव...

जुन्या पेन्शन साठी राधानगरी तालुक्यातून शेकडो शिक्षक कर्मचारी मुबईला जाणार.

Image
  जुन्या पेन्शन साठी राधानगरी तालुक्यातून शेकडो शिक्षक कर्मचारी मुबईला जाणार.   --------------------------------  राधानगरी प्रतिनिधी   विजय बकरे --------------------------------  2005 पूर्वी नियुक्ती असूनही शिक्षण क्षेत्रातील 26 हजार कर्मचाऱ्यांच्यावर जुनी पेन्शन योजना न मिळाल्याने अन्याय होत आहे. निवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या वर बेकारीची कुऱ्हाड तयार झाली आहे. यासाठी येत्या काही दिवसात मुंबई येथील आझाद मैदानावर जलसमाधी आंदोलनासाठी शेकडो कर्मचारी राधानगरी तालुक्यातून जाणार असल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.  नरतवडे तालुका राधानगरी येथे जुनी पेन्शन कोअर कमिटी व शिक्षण संघर्ष समिती यांच्यावतीने राधानगरी तालुका स्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी निर्धार व्यक्त केला यावेळी प्रमुख उपस्थिती जुनी पेन्शन कोर कमिटीचे राज्य कार्याध्यक्ष सुदेश जाधव होते अध्यक्षस्थनी राहूल पाटील होते . स्वागत शिक्षक सेनेचे अध्यक्ष एम.पाटील यांनी केले.     यावेळी बोलताना जाधव म्हणाले गेली पंधरा वर्षे जुन्या पेन्शन साठी शासन दरबारी...

कोल्हापूर शाहूपुरी परिसरात १.३७ लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक.

Image
  कोल्हापूर  शाहूपुरी परिसरात १.३७ लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक. --------------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी संस्कार तारळेकर --------------------------------- शाहुपुरी  : पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार, अवैध धंदे आणि अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचा धडाका सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ३७ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार शुभम संकपाळ आणि विशाल चौगले यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील शुगरमिल कॉर्नर ते शिये फाटा रोडवरील श्री मंगल कार्यालयाच्या पुढे एक व्यक्ती मोटरसायकलवरून येऊन गांजा विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे, LCB चे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने १८ जुलै २०२५ रोजी सापळा रचून छापा टाकला. य...

कणेरी येथील शाळेची संरक्षक भिंत कोसळली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

Image
  कणेरी येथील शाळेची संरक्षक भिंत कोसळली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. ---------------------------------------- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ------------------------------------  गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : करवीर तालुक्यातील कणेरी येथील श्री. काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची सुमारे १८ वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळे नाल्यात कोसळली आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या समोरील बाजूने वाहणारा ओढा अनेक दिवसांपासून स्वच्छ करण्यात आलेला नाही, ज्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तुटलेली संरक्षक भिंत आणि नाल्यातील ही दुर्गंधी यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. या गंभीर समस्येकडे पालकांनी शासनाचे आणि स्थानिक प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधले आहे. कोसळलेली संरक्षक भिंत लवकरात लवकर दुरुस्त करावी आणि नाल्याची स्वच्छता युद्धपातळीवर करावी, अशी मागण...

स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये मुरगूड नगरपरिषदेचा राज्यामध्ये चौथ्या क्रमांक.

Image
 स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये मुरगूड नगरपरिषदेचा राज्यामध्ये चौथ्या क्रमांक. ************************ मुरगूड/ जोतीराम कुंभार ************************ स्वच्छ सर्वेक्षण २०२५ कचरा मुक्त शहर मानांकन व हागणदारी मुक्त शहरामध्ये मुरगूड नगरपरिषदेने उच्चतम कामगिरी करुन देशात २०३५ शहरांपैकी २६ वा व २० हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटा मध्ये राज्यात १६३ शहरांपैकी ४ था क्रमांक पटकावुन आपल्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये योगदान अभादित केले आहे. म्वच्छ सर्वेक्षण २०२४ २५ मार्च ते २९ मार्च यावेळी फिल्ड असेसमेंट होऊन मुरगूड शहराला १२५०० पैकी १०००१ गुण प्राप्त झाले आहेत. यापुर्वी ही नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियामध्ये उच्चतम कामगिरी केली आहे. यापुढेही स्वच्छ सर्वेक्षण अभियान, कचरा मुक्त शहर अभियान, हागणदारी मुक्त शहर अभियान व माझी वसुंधरा अभियान यामध्ये अतिउत्कृष्ट कामगीरी करुन मुरगूड शहराचा देशात अव्वल क्रमांक पटकवण्याचा ध्यास केला आहे. असे मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अतिश वाळुंज यांनी सांगितले या अभियानात उच्चतम कामगिरी करण्यासाठी मुरगूड शहरातील सर्व नागरिक, पदाधिकारी, तरुण मंडळे, सफाई कर्मचा...

मुरगूड नगरपरिषदेमध्ये नमस्ते दिन' साजरा

Image
 मुरगूड नगरपरिषदेमध्ये नमस्ते दिन' साजरा. ******************** मुरगूड/ जोतीराम कुंभार *******************  मुरगूड येथे स्वच्छ भारत नागरी अभियान २.० अंतर्गत नॅशनल अॅक्शन फॉर मेकॅनाइज्ड गॅनिटेशन इकोसिस्टीम योजनेच्या अनुषंगाने १६ जुलैला नमस्ते दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त सफाई कर्मचा-यांची सुरक्षा व प्रतिष्ठा सुनिश्चित केली जाते. मुरगूड मुख्याधिकारी अतिश वाळूज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी नमस्ते दिन साजरा करण्यात आला. नगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांना सुरक्षेच्या उपकरणांचे महत्व सांगण्यात आले. ड्रेनेज, सेप्टिक टँकची स्वच्छता करणार्या कर्मचा-यांना आरोग्याची काळजी आणि त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. उत्कृष्ट निवड झालेले सफाईमित्र अक्षय कांबळे व अजित कांबळे यांचा सन्मान करून गौरवण्यात आले या वेळी मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतिश दा. वाळुंज कार्यालय अधिक्षक स्नेहल नरके, आरोग्य विभाग प्रमुख सचिन भोसले, शहर समन्वयक विपुल अपराध, मुकादम बबन बारदेस्कर, भिकाजी कांबळे. व सर्व सफाई कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.