मुंबईत मराठ्यांचं मेळावा आंदोलकांनी रस्त्यावरच अंघोळ, जेवण आणि झोप.
मुंबईत मराठ्यांचं मेळावा आंदोलकांनी रस्त्यावरच अंघोळ, जेवण आणि झोप.
-------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजु कदम
--------------------------------------
मोर्चातील गर्दी आणि गैरसोयी लक्षात घेऊन जरांगे यांनी आंदोलकांना शिस्त पाळण्याचं आवाहन करत, गाड्या योग्य ठिकाणी पार्क करण्यास सांगितलं. तसेच मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून दुपारपर्यंत परतण्याचा सल्लाही दिला.
मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांच्या या प्रचंड मोर्चामुळे शहरात वाहतूक ठप्प झाली, प्रशासनाच्या सर्व अंदाजांचा फज्जा उडाला, तर आंदोलकांच्या हालअपेष्टा देखील उघडकीस आल्या. मात्र, या सगळ्या गोंधळातही आंदोलकांचा निर्धार कायम असून, आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
No comments: