मानविकी पीठ, संस्कृत विभाग राजस्थान विश्वविद्यालय जयपूर तर्फे नांदेड जिल्हातील धर्माबादचे दै.प्राप्ती टाइम्स चे मुख्य संपादक पी जी कोटुरवार यांचा सम्मान.

 मानविकी पीठ, संस्कृत विभाग राजस्थान विश्वविद्यालय जयपूर तर्फे नांदेड जिल्हातील धर्माबादचे दै.प्राप्ती टाइम्स चे मुख्य संपादक पी जी कोटुरवार यांचा सम्मान.

----------------------------------------

 फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र.

पी एन देशमुख.

अमरावती  प्रतिनिधी.

---------------------------------------

 मानविकी विभागाचे अध्यक्ष, संस्कृत विभाग, राजस्थान विद्यापीठ आणि आर्य प्रतिनिधी सभा राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने 15-16 मार्च 2024 रोजी महर्षी दयानंद सरस्वती या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय संगोष्ठि चे आयोजन करण्यात आले आहे. 15 मार्च रोजी राजस्थानचे माननीय राज्यपाल श्री कलराज मिश्रा यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले.स्वामी प्रणवानंद सरस्वती, कुलपती, श्रीमद दयानंद वेददर्शन कॉलेज ट्रस्ट, गुरुकुल गौतम नगर, नवी दिल्ली, सारस्वत अतिथी, पद्मश्री डॉ. सुकामा, आचार्य विश्वावरा कन्या गुरुकुल रुरकी, विशेष अतिथी, न्यायमूर्ती सज्जन सिंग कोठारी, माजी लोकायुक्त, राजस्थान, श्री रवी नय्यर, कार्यकारी प्रमुख, आर्य समाज, राजापार्क,दैनिक प्राप्ती टाइम्स चे मुख्य संपादक पी.जी. कोटुरवार, प्रा. बलवीर आचार्य, महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक, प्रा. ओमनाथ बिमली, विभागप्रमुख, संस्कृत विभाग, दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली, डॉ. सूर्यादेवी चतुर्वेदा, प्राचार्य, आर्य कन्या गुरुकुल, शिवगंज, सिरोही, राजस्थान, श्री किशनलाल गेहलोत, अध्यक्ष, आर्य प्रतिनिधी सभा राजस्थान, श्री जयसिंग गेहलोत, कोषाध्यक्ष, आर्य प्रतिनिधी सभा राजस्थान आणि चर्चासत्राचे आयोजन सचिव डॉ. सुधीरकुमार शर्मा प्रमुख अतिथि होते. तसेच परिसंवादात सुमारे५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि ११ सत्रांमध्ये १५० शोधनिबंधांचे वाचन करण्यात आले. ज्यामध्ये भारतातील विविध देशांतून आलेल्या विद्वानांनी महर्षी दयानंद सरस्वती यांचे वेद, राष्ट्रवाद, स्वधर्म, भारतीय संस्कृती, स्वराज्य, समन्वयात्मक तात्विक दृष्टी इत्यादी विविध विषयांवर आपली मते मांडली. या कार्यक्रमातचे आायेजक आर्य प्रतिनिधि सभा राजस्थान होते. त्यात कार्यालयीन अधिक्षक म्हणुन महाराष्ट्राचे नांदेड जिल्हाचे धर्माबाद येथील भूमिपुत्र दैनिक प्राप्ती टाइम्स चे मुख्य संपादक पी जी कोटुरवार यांनी ऐतिहासिक झालेल्या या कार्यक्रमाचे व्यवस्था अतिशिय चांगले प्रमाणे नियोजन व व्यवस्था केल्याबदल त्यांचे राजस्थान विश्वविद्यालयात झालेल्या या द्वि दिवसीय राष्ट्रीय संगोष्ठि कार्यक्रमात सम्मान करण्यात आला. आर्य प्रतिनिधी सभा राजस्थानचे मंत्री श्री जीववर्धन शास्त्री यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या चर्चासत्रात भारतातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि आर्य जगतातील सुमारे 500 स्पर्धकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभाग घेतला. दूस-या राज्यात जावुन अनेक राज्यातून सहभाग नोंदविलेले अनेक विद्वान तसेच मान्यवरांचे अतिशिय चांगल्या प्रकारे व्यवस्था करून यशस्वी कार्यक्रम संपन्न करून आपली एक ओळख निर्माण केली आणि धर्माबाद तालुका व नांदेड जिल्हाचे एक मान ऊंचावल्या बदल सर्वंच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. सर्वसामान्य परिवारातून जन्मास आलेले पी.जी. कोटुरवार हे एक अतिशय इमानदारीने कष्टंाळू प्रवृतिचे व्यक्ति असल्याकारणाने त्यांना दिलेले जिम्मेदारी अतिशय मन लावुन आपले कर्तव्य निभावत असतात. तसेच राजस्थान येथील जयपुर मध्ये राहुनही नांदेड जिल्हातून नव्हे तर 4 जिल्हातून आपले दैनिक प्राप्ती टाइम्स वृत्तपत्र प्रकाशित करतात. आर्य प्रतिनिधि सभा राजस्थान हे राजस्थान येथील 500 आर्यसमाज एवं आर्य शिक्षण संस्थान चे मुख्य कार्यालय आहे. मागील 1 वर्षां पासुन कार्यालयीन अधिक्षक पदावर विराजमान होवुन संपूर्ण राजस्थान राज्यातील संस्थांचे नियत्रंण आणि व्यवस्था चांगल्या पध्दतीने करून आपल्या जन्मभूमी धर्माबादची ओळख संपूर्ण देशात निर्माण केल्याबदल अनेक मित्रपरिवारासह जिल्हयात त्यांचे कौतुकांचे वर्षांव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.