पालकमंत्री पदासाठी मुश्रीफ- अबिटकरांत रस्सीखेच.
पालकमंत्री पदासाठी मुश्रीफ- अबिटकरांत रस्सीखेच.
------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------
नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याच्या पदरात दोन मंत्री पदे पडली आहेत. हसन मुश्रीफ आणि प्रकाश अबिटकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. पण अध्याप तरी अजून पालकमंत्री कोण याबाबत उत्सुकता ताणली आहे. पालकमंत्री पदावर कोणाची वर्णी लागते याकडे आता जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. चालू च्या मंत्रिमंडळात जिल्ह्याची ताकद कमी पडली की काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
कोल्हापूर जिल्हा तसा सुजलाम आणि सुफलाम असा जिल्हा आहे. पण मंत्रिमंडळ विस्तारामध्ये या जिल्ह्याला झुकतेमाप देण्यात आले नाही. जिल्ह्यातील दोनच मंत्र्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आले आहे. हसन मुश्रीफ आणि प्रकाश अबिटकर यांच्या रूपाने हे दोन मंत्री आता कार्यरत झाले आहे. मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री पद तर अबिटकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पद बहाल करण्यात आले आहे. या दोघातील मुश्रीफ यांनी यापूर्वी मंत्रिमंडळात अनेक वेळा स्थान प्राप्त केले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांनी भूषवले आहे. यातील अबिटकर यांनी दुसऱ्या टर्ममध्ये आमदारकी भूषवून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद बहाल करण्यात आले आहे.
राज्यात तीन आघाड्यांचे सरकार आहे. यामध्ये भाजप वरचढ आहे. त्याच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. तर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रवादी काँग्रेस घोडदौड करीत आहे. त्यातच अपक्षांचाही सहयोग महायुतीच्या सरकारला राहणार आहे. जिल्ह्यात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल मधून हसन मुश्रीफ, जनसुराज्येचे शाहुवाडी पन्हाळाचे विनय कोरे, आणि हातकलंगलेचे दलितमित्र अशोकराव माने, कोल्हापूर दक्षिणमधून भाजपचे अमल महाडिक, आणि इचलकरंजीमधून राहुल आवाडे, शिवसेनेचे कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, करवीर मतदार संघातून चंद्रदीप नरके, राधानगरीतून प्रकाश अबिटकर, तर शिरोळ मधून राजेंद्र पाटील यड्रावकर राजर्षी शाहू विकास आघाडी आणि चंदगड मधून शिवाजी पाटील हे अपक्ष असे दहा आमदार निवडून आले आहेत.
एकंदरीतच मुश्रीफ हे मुरब्बी नेते असल्याकारणाने त्यांना पालकमंत्री पद दिले तर सहजासहजी जिल्ह्याचा विकास साधण्यास सहज सोपे पडणार आहे. त्यांना पालकमंत्री पदाचा असलेला अनुभव पाहता त्यांचा मुरब्बीपणा यामुळे तालुक्यातल्या समस्यांबरोबरच जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातील समस्यांचा त्यांना निपटारा करण्यास सहज सोपे काम होणार आहे. मुश्रीफ यांना जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने काम करते याचा अभ्यास असल्याकारणाने त्यांना पालकमंत्रीपद सहज भूषविता येणार आहे.
तर अबिटकर यांना अद्याप विधिमंडळाच्या कामकाजाचा आणि मंत्रिमंडळाच्या कामकाजाचा अभ्यास नाही. यामुळे त्यांना पालकमंत्रीपद दिले तर जिल्ह्याच्या विकासाला थोडी खीळ बसेल. तसेच अनेक प्रश्न प्रलंबित राहण्यास प्रारंभ होईल. जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन कसे करायचे याबाबत त्यांना सुरुवातीला माहिती घ्यावी लागेल. त्यानंतरच त्यांना त्या प्रश्नांची सोडवणूक कशा पद्धतीने करावी याचा अभ्यास करावा लागणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाचे त्यांना योगदान कशा पद्धतीने लाभते हे पाहावे लागणार आहे.
जिल्ह्यात यापूर्वी चार- चार मंत्रिपद भूषवलेला हा कोल्हापूर जिल्हा सध्या दोनच मंत्र्यांवर जिल्ह्याला समाधान मानावे लागणार आहे. यापूर्वी जिल्ह्यात अनेक राजकीय बदल झाले. पण मंत्रिमंडळातील स्थान कमीत कमी चार लोकांना मिळाले होते. पण या वेळेला मात्र दोनच लोकांना संधी मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कसा साधायचा याबाबत आता होणाऱ्या पालकमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विद्यमान मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्याची ताकद कमी पडली की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
चौकट
काँग्रेसला आत्मपरीक्षणाची वेळ...
नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. निवडणुकीत कोणत्याच काँग्रेसच्या उमेदवाराला विधानसभा गाठता आली नाही. लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेले यश पाहता काँग्रेसचा मात्र विधानसभेच्या निवडणुकीत पुरता पराभव झाला आहे. यामुळे काँग्रेस नेत्यांनी आत्मपरीक्षण करून पक्षाला बळकटी कशा पद्धतीने देता येईल यासाठीची विव्हरचना करणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment