आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा,कणखर बाण्याचे भरमगोंडा सर.

 आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा,कणखर बाण्याचे भरमगोंडा सर.

-------------------------- 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

--------------------------- 

कणखर बाणांचे भरमगोंडा सर यांचे जाण दु:खदायक आहे.माणगाव गावचा इतिहास, प्रत्येक समाजाशी संपर्क आणि व्यक्ति त्याची प्रवृत्ती बाबत खडा आणी खडा इतिहास माहिती असणारा द्रष्टा व्यक्तिमत्व गेल्याने समाजाची व गावचे फार मोठी हानी झाली आहे.


शिक्षक आणि शेती हे समीकरण जुळविणारे,पशु,आरोग्य,शेती,कुंटूब हा चक्र नैसर्गिकपणे सांभाळणारे,कुटूंबातील प्रत्येक सदस्य आरोग्याने धडधाकट असलाच पाहिजे हा विचारधारा असणारा व अस्सल ग्रामीण बाज असलेला सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे भरमगोंडा सर!


कधीही तत्वाशी तडजोड नाही. जे बोलायचे ते स्पष्ट,कोणाला रूचेल अगर न पटेल पण आपल्या विचारांवर ठाम राहून ते सत्य कसे आहे ते पटवून देण्याचे अनुभवाची शिदोरी सरांच्या कडे होती.


सरांचा,शिक्षकी पेक्षा माणगाव पासून सुरू झाली असली तरी बरेच कालावधी कुंभोज येथे गेले.इतिहास जरी सरांचा विषय असला तरी संस्कृत,गणित आणि क्रीडा यामध्ये सर फार रमत होते.ते जे वर्ग घ्याचे ते वर्गातील मुले हे पाहिले श्रेणीत असायचे,मुलांचे आरोग्य च ंगले राहावे याकरिता कबड्डी,खोखो मध्ये मुलांना खेळवायचे,मुले तालुका व जिल्हास्तरावर चमकायचे.


सर, दांभिक पणावर फार भडकायाचे.शाळेत दांभिक सहकारीवर ते तुटून पडायचे.पंरतू तत्वांशी कधी तडजोड ते केले नाहीत.शाळा एका बाजूला तर सर एका बाजूला असायचे कारण त्याला तात्विक अधिष्ठान असायचे.


शिक्षण,शेती,समाज रचना , कुटूंब कसे असावे याचे आखीव आणि रेखीव विचारधारा त्यांच्याकडे होते.समाजात फालतू वागणारे यांच्यावर ते तुटून पडायचे.दांभिकता त्यांना रूचायचे नाही. समाजातील काही चालीरिती वर ही तूटून पडायचे,सर्व विषयांना तर


त्यांचा स्पर्श असायचे,लबाडी राजकारणी वर सर त्यांचा असलेला इतिहासाचा खडनाखडा माहिती द्याचे.असे बरेच विषय सरांच्य कडून घेण्यासारखे होते.


सर,म्हणजे एक विचारधारा होते. प्रत्येक त्येक घरात जनावरे असावीत.त्यांचे संगोपन करावे, शेणापासून शेणखत मिळेल.चांगले दूध ,द,ही ताक मिळेल,हे खावून आरोग्य चांगले राहील.माणूस आजारी पडणार नाही ही धारणा असायचे. आरोग्य चांगले राहिले की शेतीसह ओझ्याचे काम करता येईल हा ग्रामीण ठसकेबाज विचारधारा सरांची असायची .ते काळाच्या कसोटीत अवघड वाटत असेल तर ते विचारधारा तात्विक दृष्ट्या योग्यच होती.


समाजातील प्रत्येक कुटूंब स्वावलंबी असले पाहिजे हा फार मोठा विचारधारा त्यांची होती.समाजातील फालतू गिरी करणारे चे इतिहास ते सांगायचे त्यामागे ते कुटूंब सरळ व वजनदार आणि ताकतीने राहिले पाहिजे ही भावना त्यांची असायची.समाजातील मुले लाठीबाजी यात तरबेज असली पाहिजे कोणी अंगावर आले की त्याला परतून लावण्यची धमक पाहिजे हा विचारधारा क्षत्रिय धर्माचे संस्कारांचे स्मरण ते करून देत.


सरांचा, सर्व विषयांना स्पर्श होता.तत्ववेत्ता,विचारवंत, गणितज्ञ, उत्कृष्ट कुंटूबप्रमुख,व्यवस्थापक, स्पष्टोक्ती असे अनेक विशेषणे त्यांना लागू होत होते.


कष्ट कसे करावे आणि तेपण काबाड कष्ट ते फक्त सरांच्या कडून शिकण्यासारखे होते.अति आहे पण ते कसे पण उधळू नये ही शिकवण सरांचे दूरदृष्टी चे साक्ष देते.


सरांचे आरोग्याकडे मोठे लक्ष असायचे.मुलांच्यापासून ते नातवांच्या पर्यंत ते व्यायाम करून घ्यायचे.घरातील दूध दूभते सक्तीने ते खायाला घालायचे.जे आरोग्याला हानीकारक ते खायचे नाही हे सरांचे अनुभव आणि दूरदृष्टीचे, भविष्याचे अचूक वेधाचे विचारधारा होता.आणि ते खरे आहे आज आपण बिस्कीट,पाव,रोटी ,पराठा,आणि मसालेदार पदार्थावर रासायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ खावून आरोग्य टिकवू यावर त्यांचा विश्वास नव्हता आणि ते खरे पण आहे.जर आपण धडधाकट राहायचे असेल तर आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर गावरान आणि घरगुती खाणेच योग्य आहे हा सरांचा फार मोठा सिध्दांत होता.


मला ते वैयक्तीक फार मोठे मार्गदर्शन करायचे . आमचे बालपणापासून त्यांची घरी जाणे येणे होते.सदोदित ते मला मार्गदर्शन करायचे.मुद्दाम भेटायला बोलावयाचे. किती वेळा तर गल्लीत वाट बघत थांबायचे अनेक विषयांवर तसानतास चर्चा व्हायचे.


तंत्वाशी कठोर असणारे सरांचे हळवेपणा 1998 साली मला आढळून आला.रात्रीचे नउ दहा वाजले असतील..सुकुमार आण्णा,राम मगदुम सर,सुनिल पाटील,मोहन शेटे,कुमार कोरेगांवे,पेठेतील मगदूम सर,नव्या घरातील नाना काका आम्ही खोलीतील मंडळी सुकुमार आण्णांच्या खोली नजीक असलेला डांबाजवळ शेंगा भाजण्यास सर्वजण जमले होतो. सोबत सुजित भरमगोंडा ही होते.सर ,आले आणि सुकुमार अण्णांना म्हणाले,सुकुमार उद्या रूबी पुण्याला अॅन्जोग्राफी करित जात आहे ,चुकून काय घडले तर घराकडे लक्ष द्या असे डोळ्यात पाणी आणून आणून बोलले घटनेचा मी साक्षीदार आहे.कठोर असणारे सरांचा तो हळवेपणा अजून माझ्या डोळ्यासमोर दिसतो.


सरांचा ,इतका दरारा होता की एकदा बोलले की त्यापुढे कोणीही अपील करायचे नाही.हा त्यांचा खमकेपणा आता परत कोणाला जमेल ते शक्य नाही. आणि असा खमक्या विचारधारेचा माणूस परत कोणी तयार होईल असे वाटत नाही.सार्वजनिक पैशाचा वापर योग्य कारणाकरिता झाले पाहिजे हा ठाम विचारधारा असणारा आणि सार्वजनिक जीवनात दरारा असणारे,सरांच्या जाण्याना समाजाचे फार मोठी हानी झाली पण एक अधिकारवाणीने बोलणार व्यक्ती आता नसणार याचे फार मोठे दुख आहे.सरांचे नेहमी स्मरण होतं राहणार हे निश्चित.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.