दालमिया सिमेंट कंपनीत जिवतीतील गरीब तरुणाचा मृत्यू.
दालमिया सिमेंट कंपनीत जिवतीतील गरीब तरुणाचा मृत्यू.
------------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
------------------------------------
प्रकाश बळीराम राठोड, वय 39 वर्षे यांचा मृत्यू.
कंपनीने घटनास्थळावरील मृताचे सांडलेले रक्त व गाडीवर माखलेले रक्त धुऊन पुरावा नाहीसा केल्याची चर्चा.
कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत सिमेंट बॅग भरण्यासाठी जिवती येथून आयचर गाडी घेऊन गेलेल्या आयचर वाहनाचे ड्रायव्हर प्रकाश राठोड यांचा मृत्यू झाला असून, ही घटना शुक्रवारी राञोच्या सुमारास घडली आहे. मृतकास कंपनीकडून नुकसान भरपाई व मयताचे नातेवाईकास नोकरी देणार नाही; तोपर्यंत मृतकचे नातेवाईक मृतकाची बाॅडी ताब्यात घेण्यास नकार देणार असल्याने, प्रचंड तणाव वाढण्याची शक्यता निर्माण होणार असल्याचे मयताचे नातेवाईकांकडून समजले.
प्रकाश बळीराम राठोड (39), रा. वार्ड नं. 3, जिवती असे मृत चालकाचे नाव असून, दालमीया कंपनीत आयचर गाडीत सिमेंट भरल्यानंतर गाडीचे मागचा पल्ला लावत असताना, कंपनीतील सिमेंट काट्यावर दुस-या गाडीने हलगर्जीपणाने गाडी रिव्हर्स घेऊन, दोन्ही गाडीच्या मागील पल्ल्यात प्रकाश राठोड यास दाबल्याने चालक प्रकाश राठोड गंभीर जखमी झाल्याने, त्यास रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच दालमिया सिमेंट कंपनीतील ट्रान्सपोर्टचे काम करणारे काही चालक व जिवती तालुक्यातील लोकप्रतिनिधी व नातेवाईकांनी मृतक कामगाराच्या परिवाराला न्याय मिळावा, यासाठी कंपनीचे काम बंद पाडणार असून, मृतकाचे नातेवाईक व लोकप्रतिनिधी चंद्रपूर रुग्णालयामध्ये डेरा दाखल केल्याचे दिसले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईक व लोकप्रतिनिधींनी घेतली आहे.
दालमिया कंपनी व्यवस्थापनाचे पदाधिकारी जखमीला तातडीने उपचार मिळण्यास जवळील दवाखान्यात उपचार करण गरजेचे होते. परंतू सदर कंपनी व्यवस्थापणा कडून तसे न करता सदर घटना ही कंपनी च्या बाहेर घडली असल्याचे दाखविण्यासाठी घटनास्थळी सांडलेले मयताचे रक्त पाण्याने धुऊन काढल्याचे
समजले.सदर कंपनीने मृतक यास तातडीने उपचार दिले असते तर जखमीचा जीव वाचला असता , सदर कंपनीने आपले कृत्य लपविण्या करीता जखमी यास तिन चार तास लपवून ठेवले, त्यांच्या अशा हलगर्जीपणा मुळे एका गरीबांच जीव गेला आहे. करीता दालमिया केपनी व्यवस्थापन व ट्रान्सपोर्ट मृतकाचे मृत्यूस कारणीभुत असल्याने मृतकाचे नातेवाईक आक्रमक झालेले दिसले. मृतकाचे कुटुंबातील सदस्याला कंपनीत स्थायी नोकरी व आर्थिक साहाय्य देण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे; परंतु व्यवस्थापनाच्या ताठर भूमिकेमुळे मागणी मान्य होत नसल्याने नातेवाईक व राजकीय कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर ठिय्या मांडणार असून, शवविच्छेदन होताच मृतदेह कंपनीत आणून ठिय्या मांडणार असल्याचे समजले.
*लोकप्रतिनिधींची मध्यस्थी*
कंपनी व्यवस्थापन व नातेवाईक यांचे संघर्ष शिगेला पोहोचणार असून यात लोकप्रतिनिधींनी व्यवस्थापन व नातेवाईक बाजू एकमेकांसमोर मांडून, मयताच्या नातेवाईकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाला त्यांनी विनंती करीत आहेत आणि कंपनी व मयताच्या नातेवाईकांचा संघर्ष मिटविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
Comments
Post a Comment