सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून तो कितपत योग्य?
सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून तो कितपत योग्य?

-------------------------------------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी - अमर इंदलकर
-----------------------------------------------------------
सातारा जिलह्यात अनेक पर्यटण स्थळे असून पावसाळ्यात ह्या पर्यटन स्थळाना खूप मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील होते. पुणे, मुंबई, बारामती,अशा विविध ठिकाणाहुन हौसी पर्यंटक शनिवारी रविवार सुट्टीच्या दिवशी गर्दी करतात. सातारा जिल्ह्यात ठोसेघर धबधबा, कास पठार, पाचगणी, महाबळेश्वर,इत्यादी अनेक ठिकाणे असून तेथील गरीब लोकांचा उदरनिर्वाह हा ह्या पर्यटक लोकांवरच अवलंबून असतो. सातारा जिल्हा प्रशासनाने घेतलेला 19 ऑगस्ट पर्यंत साताऱ्यातील सर्व पर्यटन बंद हा निर्णय थोडा कठोरपणाचा वाटत असून अशा निर्णयावर जनतेतून समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरड कोसळेल म्हणून पर्यटण बंद करण्याची वेळ येण्यापर्यंत प्रशासन एप्रिल- मे महिन्यात झोपा काढत होते का? अशी प्रतिक्रिया उमटताना पाहावंयास मिळत आहे.
Comments
Post a Comment