सब गोलमाल है भाई सब गोलमाल है लाभर्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवणाऱ्या दुकानादारावर कारवाई करा
सब गोलमाल है भाई सब गोलमाल है लाभर्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवणाऱ्या दुकानादारावर कारवाई करा रविकुमार बंडीवार महामंत्री भाजपा पदाधिकारी यांची मागणी.
.jpeg)
------------------------------------------------
मंगेश तिखट
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
-----------------------------------------------
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नपुरवठा विभागातील राशन धारकांना नांदा येथील राशन दुकानदाराकडून नियमितपणे राशन न मिळत असल्यामुळे लाभार्थी कुटुंबांना मागील दोन ते तीन महिन्यापासून धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली असून त्या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी भाजपा महामंत्री रवीकुमार बंडीवार यांनी केली आहे.
प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी यांना कुटुंबंतील प्रतिव्यक्ती ५ किलो राशन,तसेच अंतोदय योजनेतील कुटूंबातील यांना शासनाकडून ३५ किलो धान्य मिळते गावागावात वितरण करण्यासाठी राशन दुकानदारांची निवड करून त्यांच्या हस्ते धान्याचे वितरण केल्या जाते मात्र मागील दोन ते तीन महिन्यापासून नांदा येथील राशन दुकानदाराकडून नियमित राशन दिल्या जात नसल्याने नागरिकांना आपल्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे
दर महिन्याला वेळीच धान्य राशन दुकानदार यांचेकडे पुरवठा करून दिले जात असल्याची माहिती कोरपना पुरवठा विभागाकडून मिळते मग लाभार्थी यांना वंचित राहण्याची वेळ का येत असेल प्रश्न उपस्थित होत असून गोरगरीब यांच्या हक्काचे धान्य नेमके जात तरी कुठे आहेत असा सवाल आता उठत आहेत.
तर नियमित राशन वितरण न करणाऱ्या व राशन लाभार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या दुकानदारावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी भाजपा महामंत्री रवीकुमार बंडीवार यांनी या प्रकरणी तालुका पुरवठा निरीक्षक यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
Comments
Post a Comment